तू सारखी म्हणतेस माझा नंदा गेला
पण मी कधीच गेलो नाही गं आई
मी फक्त शरीर मातीला दिलं पण
आठवणी तुझ्यातच ठेवल्या ना गं
आयुष्यभर मला सुखी ठेवण्यासाठी झिजलीस
आता तर खरे मी स्वर्गात खूप आल्हादित आहे
फरक एव्हढाच आहे की मी तुझ्या जवळ नाही
पण मन तर तुझ्या अवतीभवतीच घुटमळतंय गं
तुला उब देणारी सकाळची कोवळी किरणे
सायंकाळी येणारा हवेचे शीतल मंद झोके
ह्यातूनच मी येऊन तुझ्या कुशीत सामावतो
दूर नाही, तुझ्या इर्दगिर्दच
घिरट्या घालतोय गं
रात्री तुझ्या उशीवरचे ओले डाग
ते पाहून मी अगदी गलबलून जातो
रडून रडून काय अवस्था केलीस बघ
सुखात आहे मी, चल आता शांत हो गं
......अविनाश माईणकर
No comments:
Post a Comment